
आर्थिक गुन्ह्यांत तसेच स्त्रियांविरोधी गुन्ह्यांत ठळक वाढ झालेली आहे. पर्यटनास चालना देताना गुन्हेगारीस आळा बसेल हेही आपण पाहिले पाहिजे.यासाठी प्रभावी आध्य्यात्मिक नेतृत्वाची गरज आहे.अन्यथा चंगळवाद फोफावेल व गुन्हेगारी मानसिकता वाढेल.सर्वच बाबतीत संयम हा व्यक्तिगत व सामाजिक आरोग्यासाठी आवश्यक असतो.आपणास परमेश्वरकृपेने जे काही मिळते ते इतरांना निरपेक्ष बुद्धीने थोडेफार देण्यामुळे आपले व समाजाचे आध्यात्मिक हित होते.
एकंदरीत संयम आणि दान या दोन गोष्टी सध्याच्या परिस्थितीत फार महत्वाच्या आहेत.