शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०१२

शिदोरी



-याच वेळा मनुष्याला आपल्या मनात काय असते ते किंवा आपले काय म्हणणे असते ते ओळखता येत नाही.त्यामुळे आपण मानसिक आजाराला बळी पडलो आहोत कि काय असा संशय येऊ लागतो परन्तु आपल्या मनातील विचारांचा, भावनांचा थांग लागल्यावर प्रश्न किती सोपा होता ते लक्षात येते.नंतर प्रश्नही विरघळून जातो आपले मन प्रसन्नतेने भरून येते पुढच्या जीवनप्रवासासाठी आनंदाची शिदोरीच आपणांस मिळते जी आपला पुढचा जीवनप्रवासही सुखकर करते.बर-याचदा आपणांस काय पाहिजे ते आपणांस माहीतही असते परन्तु समाजाच्या भ्रामक दडपणामुळे आपण त्यावर दुसरीच इतकी पुटे चढवितो कि मुळात आपल्या मनाची मागणी काय होती हेच अस्पष्ट होऊन जाते.अशावेळी आपल्या मित्रांचा वडीलधा-यांचा योग्य तो आधार मिळाल्यामुळे आपली वाटचाल सोपी होते कारण काही गुंता आपला आपण स्वत: सोडविणे शक्य नसते.

ज्यावेळी आपला एक माणूस सावंतवाडीचा असतो त्याच वेळी तो महाराष्ट्राचा असतो, त्याच वेळी तो भारताचा असतो, त्याच वेळी तो आशियाचा असतो, त्याच वेळी तो जगाचा असतो. अशाच प्रकारे हा परीघ विस्तारत ब्रह्मांडा पर्यंत जातो.अहं ब्रह्मास्मि या वेद वाक्याचा अर्थ हेच सांगतो कि भक्त हाच भगवंत आहे आणि आपण आपल्या आपापसातील नात्यांच्या अंतरंगात हाच अर्थ उमटलेला प्रत्यक्षातही पाहू शकतो.ही गमतीशीर गोष्ट आपल्या सगळ्यांच्या बाबतीत घडत असते परंतु आपल्याला त्याची कल्पनाच येत नाही.हे निर्मळ आनंदाचे गुप्त धन खरेतर आपल्या जवळच असतो.मात्र स्वत:कडे भक्तपणा घेऊन इतर सर्व विश्वात भगवंताला पाहिले तरच भक्तीचा खरा आनंद आपणांस घेता येतो.ही गोष्ट अनेक प्रकारे भक्त व भगवंत यांच्या नात्यास पोषक ठरते व हेच योग्य असते कारण जे लाभत नाही त्याचा ध्यास घेऊ नये असे नसून आपण लौकिक दृष्टीने जे नसतो ते आपण आहोत असे हे लोकांच्या लक्षात येइल अशाप्रकारे बडबडू नये तर आपण अलौकिक आहोत असे आपले आपणच फक्त समजुन घ्यायचे असते.

काही नाती अशी असतात कि ती एकाच वेळी माता, पिता, सखा, बंधू अशी अनेक रुपे धारण करतात अशा अनेकपदरी नात्यांचा वेध घेणे फारच दुरापास्त होऊन बसते या संमिश्र भावनांचे कल्लोळ आवरता येत नाहीत तसेच प्रगटही करता येत नाही.अशावेळी आपल्या व्यक्तित्वाच्या चिंधड्या झाल्यासारख्या वाटतात.खरेतर आपल्या अध्यात्मात अशा गोष्टींचा उल्लेख केलेला नाही असे नाही परन्तु आपण त्यादृष्टीने आपल्या पारंपारिक ठेव्याकडे पहात नाही.आपण देव पाषाणमुर्तींमधे शोधतो आणि माणसांतला देव हरवतो. अशावेळी आपण एखाद्या मुलीबरोबर एक मुलगा पाहतो तेव्हां आपण गृहीत धरतो कि वाईट संबंध असतील.कृष्ण हा बालक होता तेव्हां ते आपल्या लक्षात येत नाही कि ते एका बालकाचे गोपिकांशी मधुर संबंध आहेत; कृष्णाचे मधुर संबंध आहेत ते परमात्मा या भूमिकेतून आहेत व ते त्याच्यापेक्षा वयाने कितीतरी मोठ्या असलेल्या गोपिकांशी नसून आत्मा व परमात्मा यांचे मिलन आहे.हाच प्रकार कोणत्याही व्यक्तींमधील जवळीकीस आजच्या काळातही लागू होतो.कारण ते त्रिकालातीत अमृततत्व म्हणजेच भक्त-भगवंताचे अनेकपदरी नाते कोणत्याही व कितीही व्यक्तींना लागू होते व अशी मैत्री गैर अर्थाने घेऊ नये एवढेच नव्हे तर ते दोषदृष्टीने पाहणे अक्षम्य पाप असते.

एक हात पूर्वजांच्या म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, प्रेषित मुहमद, भगवान बुद्ध, प्रभु येशु, आदि सर्व मुक्तमौक्तिकांच्या अनादी अनंत मालिकेतील सर्व पुर्वसुरींच्या हाती देऊन दुसऱ्या हाताने वर्तमानाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य आपल्याला मिळो हीच सर्वव्यापी ईश्वराच्या चरणी प्रार्थना.
माता रामो मत्पिता रामचंद्र:
स्वामी रामो मत्सखा रामचंद्र:
सर्वस्वं मे रामचंद्रो दयालु:
नान्यं जाने नैव जाने जाने

सच्चिदानंदाचा येळकोट
*
हरि ॐ तत्सत्
*

बुधवार, ८ फेब्रुवारी, २०१२

एकांत




आकांत मांडिला असता
मी, माझिया गणेशाने
कृपा करुनी मजवरी
केला हा भवरोग बरा

चांचुवरी पाखरा
बाळ घालीतसे चारा
कोण कुणा भरविते
एक मुख एक चारा

देणारा ईश्वर आहे
का चिंता करीसी माये
मी खातो तुही खा गे
हा विलाप नाही खरा

कासाविस का झालीस
मी पुसतो अश्रु तुझे
मी असताना तू उगाच
सोडणार नाही धीरा

तू निवांत हो गे माये
मी कुशीत तुझिया आहे
बसलेलो तुला धरून
एकांत नाही हा खरा

दिवोरातिचे उठले ठाणे
तुटले धरणे प्रपंचाचे
जीवनमुक्तदशा जाहली
पाहिला चतुर्थी दिन हा खरा

*
हरि ॐ तत्सत्
*

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०१२

दुष्टचक्र



व्यसनांमधे कितीही भोगांची आहुती टाकली तरी त्यांची आग शमण्याऐवजी अधिकाधिक भडकतच जाते. धुण्याचा पिळा पुन्हा पुन्हा वर उंच फेकून खाली आपटतात त्याप्रमाणे आपण तृप्तीच्या पुन्हा अतृप्तीच्या लाटांच्या आन्दोलनांवर लाचार होऊन उंच फेकले खाली आपटले जात राहतो.आपण लाचार गुलाम झाले आहोत हे अनुभवास येऊनही व्यसनांची गुलामगिरी आपण कितीही प्रयत्न करूनही सोडू शकत नाही. आपण त्यात पोळत असतो परन्तु त्यातून सुटण्याचे सामर्थ्य आपणांत रहात नाही.

असे असेल तरीही भगवंताचे नामस्मरण हा या दुष्टचक्रातुन सुटण्याचा एकमेव खात्रीशीर मार्ग नेहमीच सहजतेने कुठेही उपलब्ध असतो. भगवत्प्रेम हे माणसाला वाटेल त्या संकटातून बाहेर काढते भगवद्भक्तिमुळे माणसातच माणसाला भगवंताचे दर्शन होते.निराकार निर्विकार भगवंताच्या सगुण साकार स्वरूपाचे मनुष्यदेहात दर्शन होणे हे याचि देहि याचि डोळा शक्य आहे ही खात्री प्रत्यक्ष भगवंतानेच दिलेली आहे.


काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल
नांदतो केवळ पांडुरंग

*
हरि ॐ तत्सत्
*

शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०१२

मुक्तिबोध



कशास आई भिजविसी डोळे
उजळ तुझे भाळ
रात्रीच्या गर्भात उद्याचा
असे उष:काल

या गाण्या नंतर पुढच्या पिढीची कविता अशी आहे -

उष:काल होता होता काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली

परंतु या दोन्ही गाण्यांच्या कित्येक वर्षे आधी ज्ञानेशांनी जे लिहीले ते असे आहे -

माझा मराठाचि बोल कौतुके
अमृतातेही पैजा जिंके
ऐसी अक्षरे रसिके मेळविन

हा विचारांतील फरक लक्षात घ्या.ज्ञानेशांच्या व्यक्तिगत जीवनात त्याकाळातील समाज जीवनातही दु: होते जे या अर्वाचीन कविंच्या तुलनेत खुपच जास्त होते.परन्तु ज्ञानेशांच्या वाङ्मयात वेदनेचा लेशही नाही कारण त्यांच्या जीवनात दु:खाला वेदनेला स्थानच नव्हते, ते अतिशय सुखात होते.

त्यानंतरही अशा प्रकारच्या सुखी संतांची मालिकाच आपणांस पहावयास मिळते जी आज पर्यंत टिकून आहे यापुढेही राहील.खरे म्हणजे आपण आपल्या व्यक्तिगत सामाजिक आयुष्याकडे योग्य दृष्टीकोनातुन पहात नाही.सूर्य सगळ्यांनाच प्रकाश देतो परन्तु जर आपण त्यास नाकारण्याचाच हट्ट धरला तर तो आपलाच करंटेपणा असतो.ज्ञानेशांच्याही पूर्वीपासून पारतंत्र्य होते परन्तु जे आग्रहाने स्वतन्त्र राहतात ते स्वत:सह जगासही मुक्त करू शकतात.

आपले भवितव्यच उज्वल असणार असे नाही तर आपला वर्तमानकाळ उज्वल आहे भुतकाळही उज्वलच होता.
*
हरि ॐ तत्सत्
*


गुरुवार, २ फेब्रुवारी, २०१२

परमेश्वरप्राप्ति



ॐ परिसोनी परिसावे

माझ्याकडे सर्व सुखसाधने उपलब्ध असुनही
परमेश्वरप्राप्ति वाचून ती सर्व मला निरुपयोगी आहेत

ज्याप्रमाणे नदी सागराला मिळाली असुनही
तिची सागरालाच मिळत रहाण्याची
उत्कंठा सततच तीव्र राहते

किंवा एखाद्याला जीवन मिळाले असुनही
त्याची जीवनाबद्दलची उत्कंठा सततच तीव्र राहते
जिवंत राहण्याची आसक्ती मरत नाही

त्याचप्रमाणे मला परमेश्वरप्राप्ति होउनसुद्धा
माझी परमेश्वरप्राप्तिची उत्कंठा अजुनही तीव्र आहे
कारण माझी विरह व्यथा अविट आहे

खरे पाहता त्या परमेश्वराने
मला अशा अवस्थेत पोहोचविले आहे
कि मला सर्वत्र तो एक परमेश्वरच दिसतो

 

इतकेच काय मला स्वत:ऐवजी
आरशात सुद्धा तो परमेश्वरच दिसतो
 

माझ्या परमेश्वर स्वरुपाचे ज्ञान मला आहे
 

ही त्या भवतारक, देवकीनंदन, रुक्मिणीपति,
परमपिता श्रीकृष्णाची कृपा आहे
हरि तत्सत्




जय जय राम कृष्ण हरी 


माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित

*

DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI

*



इश्वरसे अभिन्नता जीवका मूल धर्म है जो किसीभी तरीकेसे कभीभी बदलता नहीं. जैसे तरंग और समुन्दर कभी जुदा नहीं होते वैसेही जीव अपने परमात्म स्वरूपसे कभीभी जुदा नहीं होता. Being connected to the God is the religion of all, which can never be changed. The God is not separate and not distinct from his creation, just like a wave is not separate or distinct from the ocean.