सोमवार, ६ फेब्रुवारी, २०१२

दुष्टचक्र



व्यसनांमधे कितीही भोगांची आहुती टाकली तरी त्यांची आग शमण्याऐवजी अधिकाधिक भडकतच जाते. धुण्याचा पिळा पुन्हा पुन्हा वर उंच फेकून खाली आपटतात त्याप्रमाणे आपण तृप्तीच्या पुन्हा अतृप्तीच्या लाटांच्या आन्दोलनांवर लाचार होऊन उंच फेकले खाली आपटले जात राहतो.आपण लाचार गुलाम झाले आहोत हे अनुभवास येऊनही व्यसनांची गुलामगिरी आपण कितीही प्रयत्न करूनही सोडू शकत नाही. आपण त्यात पोळत असतो परन्तु त्यातून सुटण्याचे सामर्थ्य आपणांत रहात नाही.

असे असेल तरीही भगवंताचे नामस्मरण हा या दुष्टचक्रातुन सुटण्याचा एकमेव खात्रीशीर मार्ग नेहमीच सहजतेने कुठेही उपलब्ध असतो. भगवत्प्रेम हे माणसाला वाटेल त्या संकटातून बाहेर काढते भगवद्भक्तिमुळे माणसातच माणसाला भगवंताचे दर्शन होते.निराकार निर्विकार भगवंताच्या सगुण साकार स्वरूपाचे मनुष्यदेहात दर्शन होणे हे याचि देहि याचि डोळा शक्य आहे ही खात्री प्रत्यक्ष भगवंतानेच दिलेली आहे.


काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल
नांदतो केवळ पांडुरंग

*
हरि ॐ तत्सत्
*

माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित

*

DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI

*



इश्वरसे अभिन्नता जीवका मूल धर्म है जो किसीभी तरीकेसे कभीभी बदलता नहीं. जैसे तरंग और समुन्दर कभी जुदा नहीं होते वैसेही जीव अपने परमात्म स्वरूपसे कभीभी जुदा नहीं होता. Being connected to the God is the religion of all, which can never be changed. The God is not separate and not distinct from his creation, just like a wave is not separate or distinct from the ocean.