सोमवार, २० मार्च, २०२३

कृषीसहकार

उद्धरेदात्मनाऽऽत्मानं नात्मानमवसादयेत्।
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः।।
|| विना सहकार नाही उद्धार ||
एकटे कार्य करू नका, एकत्रित व्हा. YOU HAVE GREAT POTENTIAL. तुम्ही समर्थ आहात, सक्षम आहात याची खात्री बाळगा. कुणीतरी त्रयस्थ व्यक्ती किंवा सरकार तुमची मदत करील, या आशेवर बसू नका.
मी भारतीय आहे. यू ट्यूबवर आर्थिक व औद्योगिक सुधारणांबाबत अनेक व्हिडीओंचा पूर आलेला पाहतो. परंतु शेतीविषयावर एकही चित्रफीत नाही. भारत कृषीप्रधान देश आहे.
The agriculture sector is one of the most important industries in the Indian economy. In terms of employment, the agriculture sector provides livelihood to over 151 million people. Approximately 60 percent of the Indian population works in this industry, contributing about 18 percent to India's GDP. 26-Jan-2023
 शेती हा आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे. याकडे वर्तमान परिस्थितीमध्ये अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट दिसते. खेड्यातच खरा भारत नांदतो. पण भारताला अनैसर्गिकपणे अमेरिका किंवा चीन बनवले गेले तर त्याचे अनेक सामाजिक दुष्परिणाम पहायला मिळतील. उदाहरणार्थ शहरांकडे पळणाऱ्या माणसांच्या लोंढ्यांचे नियोजन व शहरी विकासकामांसाठी व्यवस्थेवर येणारा अनियंत्रित ताण, झोपडपट्टी व गलिच्छ वस्ती प्रतिबंध, नियंत्रण, निर्मुलन, विस्थापन. तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन इत्यादी अनेक प्रश्न उद्भवणारच नाहीत जर खेडी स्वयंपूर्ण झाली, बळीराजा सधन, संपन्न झाला तर. हे खरे तर वैश्विक सत्य आहे. आपण सगळेच जण निसर्गाचा हात सोडून भलतीकडेच भरकटत चाललो आहोत. आपल्या ( माणसाच्या ) मूलभूत गरजा एवढ्या जास्त नाहीतच. आपण कशासाठी हा सर्व तथाकथित विकास फुगवटा  करत आहोत ? जिथे आपल्याला श्वास घ्यायला स्वच्छ हवा मिळणे देखील मुश्किल होते अशा तऱ्हेची शहरे वाढवण्यात काय फायदा ? 
काय असल्या शांघायचा आणि सिंगापूरचा उपयोग ? अमर्त्य सेन यांच्या अर्थशास्त्राकडे दुर्लक्ष करणे दुर्दैवी ठरेल. गांधीजींनीही 'खेड्याकडे चला' हाच मंत्र दिला होता जो मंत्र आज आपण विसरलो आहोत. आजकाल गांधीजींच्याऐवजी गोडसेचे गोडवे गायले जात आहेत. हे सगळेच अनैसर्गिक व अनाकलनीय आहे. गोडसेने पाकिस्तानात जाऊन जिन्नाला ठार  मारले असते तर  मी गोडसेलाही शहीदांच्या यादीत सामील केले असते. परंतु हे गोडसेचे नातेवाईक, भारतीय इतिहासावर व तत्वज्ञानावर बंदूक चालवू लागलेत. भारतीयत्वाचा खून करायला निघालेत. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या अभिमानास्पद तेजस्वी झळाळत्या इतिहासावर अशीच चिखलफेक चालू राहिली तर त्यामुळे आपल्या पुढील पिढ्या मनाने पांगळ्या होतील, खच्ची होतील. मी अमर्त्य सेन आणि गांधीजी यांचा उल्लेख करतोय याचे कारण हे आहे की त्यांच्या शिकवणुकीला दूर लोटून तळागाळातील माणूस सुखी होऊ शकणार नाही. खेड्यातील संस्कृतीचा व अर्थकारणाचा विनाश होईल. हे आपण थांबवलेच पाहिजे. हरीत क्रांती व श्वेत क्रांतीची अमृतमधुर फळे आपण आजही चाखतोय हे विसरून कसे चालेल ? अशाच शेतीपूरक व्यवसायांच्याही नवनवीन योजना अमलात आणा. ARTIFICIAL INTELLIGENCE BASED HIGHTECH ORGANIC FARMING, सेंद्रिय कचरा पुनर्वापर, स्वच्छ इंधन,  मासळीपालन, अन्नप्रक्रिया, शेतीमालाची शेतावरून थेट निर्यात, आडत्यांच्या व व्यापाऱ्यांच्या साखळीतून शेतकऱ्यांची सुटका, grading, packaging, marketing, सामुदायिक शेती, vertical farming,  green house farming यासाठी अमूलसारख्या सहकारी कंपन्यांच्या चळवळींचा समावेश, शेतकऱ्यांना training व पतपुरवठा, तसेच शेतकऱ्यांच्या मरगळलेल्या, कोमेजलेल्या मनांना मानसिक उभारी देणे. नदी जोड प्रकल्पाचा प्रकर्षाने पाठपुरावा व प्रयत्नपूर्वक त्वरेने अंमलबजावणी, इत्यादी अनेक गोष्टींवर विचार करा, भूमीहीन शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी धोरणे ठरवा व त्यानुसार कृती करा. तरूणांच्या उच्चशिक्षणाचा व प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग SMART अत्याधुनिक शेतीसाठीच करता येईल असा धडक कार्यक्रम हाती घ्या. आपण पुष्कळ काही करू शकतो. आपण अन्नधान्य पुरवठा करणाऱ्या देशांच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर टिकून राहू शकतो.
सुधारणा या करायच्याच असतात. परंतु स्वतःच्याच इतिहासाला लांछन लावून नाही तर पूर्वसूरींचे बोट धरूनच भविष्यातील वाटचाल करा. इतिहासाचा उज्ज्वल आधार धुडकावून दिला तर आपलेच पाय निश्चितपणे पांगळे झाल्याशिवाय रहाणार नाहीत हे ध्यानात घ्या. 
|| यत्न तो देव जाणावा ||
आपुलिया बळे नाही बोलवत 
सखा कृपावंत वाचा त्याची ॥
काय म्या पामरे बोलावी उत्तरे 
परी त्या विश्‍वंभरे बोलविले ॥
साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी
शिकविता धनी वेगळाची ॥
तुका म्हणे त्याची कोण जाणे कला 
वागवी पांगुळा पायावीण ॥
हरि ॐ तत्सत्
तुकाराम बीज

माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित

*

DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI

*



इश्वरसे अभिन्नता जीवका मूल धर्म है जो किसीभी तरीकेसे कभीभी बदलता नहीं. जैसे तरंग और समुन्दर कभी जुदा नहीं होते वैसेही जीव अपने परमात्म स्वरूपसे कभीभी जुदा नहीं होता. Being connected to the God is the religion of all, which can never be changed. The God is not separate and not distinct from his creation, just like a wave is not separate or distinct from the ocean.