सोमवार, ३० जानेवारी, २०१२

ध्येय



मी माझ्या एका स्वकर्तुत्वावर करोडपति झालेल्या मित्राला म्हणालो कि तुझ्या यशाचे रहस्य मला सांग म्हणजे मीही करोडपति होइन.त्यावर तो म्हणाला कि तू तसे काही करू नकोस.मी खट्टू होउन त्याला म्हणालो कि मग माझ्या आयुष्याचे ध्येय काय असावे?तो म्हणाला या प्रश्नाचे उत्तर मी तुला देणार नाही तर हे आत येत आहेत ते आमचे कीर्तनकार बुवा महाराज देतील.नंतर त्याने महाराजांना नमस्कार करून त्यांना माझा प्रश्न सांगितला आपण आज संध्याकाळी होणा-या कीर्तनाचा हाच विषय असावा असे त्यांना सुचविले.मी फारच नाराज होउन तेथून निघालो.मनात म्हणालो हा करोडपति फारच खडूस आहे.तो मला ठकवतोय.मला धन मिळविण्याचा उपाय सांगण्या ऐवजी या महाराजाचे कीर्तन ऐक म्हणतोय.मी काय कीर्तने ऐकली नाहीत काय आजवर.


तरीसुद्धा त्याच्या आग्रहाला मान देऊन मी ते कीर्तन ऐकले.बुवा उत्तम गायक होते त्यांच्या गायनाने कीर्तनात चांगला रंग आणला.शेवटी त्यांच्या कीर्तनाचा जो निष्कर्ष निघाला तो असा होता कि मोक्ष मिळविणे अर्थात परमेश्वर प्राप्ति हेच मनुष्याच्या देहाचे एकमेव ध्येय असायला पाहिजे.त्यानंतर त्यांनी संत तुकाराम महाराजांचा "धन मिळविले कोट्यानुकोटीसंगे जाणार नाही लंगोटी । । " हा अभंग छान आळवुन गायला.


गीतेमध्ये सांगितले आहे कि देहममतेमुळे देहाचे सुख-दु:ख; आत्मा म्हणजे आपण स्वत: भोगतो व कर्माहंकारामुळे मी हे करतो, मी ते करतो, मी अमुक करणार, मी तमुक करणार असे म्हणतो.परन्तु वस्तुत: आपण कर्म करत नाही व कर्माचे फळ भोगत नाही.आत्मा अकर्ता व अविकारी असतो.देह प्रकृतिवशात कर्म करत असतो व कर्मफळ भोगत असतो.भौतिक विषयसुखे अनित्य असतात, मनुष्यप्राण्याला लाचार बनवतात व दारुण दु:ख़ास कारणीभूत ठरतात तरीसुद्धा आपण असेही म्हणू शकत नाही कि मी आता अजिबात कर्म करणार नाही.देह व इन्द्रिये आपापल्या गुणानुसार कर्म करीतच राहतात.जसे हात पाय तोंड बांधून मुटकुळे करून रथात टाकलेला माणूस काहीही कर्म न करता रथ जिकडे नेईल तिकडे रथाच्या वेगाने जात राहतो त्यानुसार प्राणी प्रकृतीचा गुलाम बनून कर्मे करतच राहतो.


मात्र प्रकृति ही परमेश्वराच्या अधीन असल्यामुळे व खुद्द परमेश्वरच देहाच्या ठायी आत्मस्वरुपाने निवास करत असल्यामुळे आपण अहंकाररहित व स्वार्थरहित वृत्तीने इश्वरार्पण बुद्धीने कर्म केल्यास आपणास नैष्कर्म्य प्राप्त होते.आपण मोक्ष अर्थात परमात्मपदाची प्राप्ति करतो.


नष्टो मोह: स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाsच्युत ।
स्थितोsस्मि गतसन्देह: करिष्ये वचनं तव ।।


*
हरि तत्सत्
*


माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित

*

DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI

*



इश्वरसे अभिन्नता जीवका मूल धर्म है जो किसीभी तरीकेसे कभीभी बदलता नहीं. जैसे तरंग और समुन्दर कभी जुदा नहीं होते वैसेही जीव अपने परमात्म स्वरूपसे कभीभी जुदा नहीं होता. Being connected to the God is the religion of all, which can never be changed. The God is not separate and not distinct from his creation, just like a wave is not separate or distinct from the ocean.