शुक्रवार, २७ जानेवारी, २०१२

शिवसाई




मी शिवसाई बोलतोय. मला क्लेश होत आहेत कारण समाजमन अजुनही एकसंध झालेले नाही, माझ्या प्रयत्नांची आवश्यकता अजुनही बाकी आहे. माझे जीवितकार्य संपलेले नाही. मी पंढरपुरच्या देवळात दर्शनासाठी गेलो असताना मला स्पष्ट ऐकू आले कि आता तुला श्रीखंड मिळेल. त्याचा अर्थ मला समजला नव्हता कारण श्रीखंड कोणते ते मला समजले नाही. परंतु नंतर माझ्याकडून एक पुस्तक लिहून प्रकाशित झाले. त्यावेळी मी माझ्या मित्रांना म्हणालो होतो कि हे माझ्या आयुष्याचे मंथन करून लोणी काढलेले आहे. नंतर मला स्वप्नात साईबाबा दिसले. ते गादीवर बसलेले होते व मी त्यांच्यासमोर उभा होतो.त्यांना मी कपाळास विभूती लावली व त्यांच्या हातात विभूती ठेवली. त्यानंतर त्यांनी माझ्या हातात एक छोटी कागदाची पुडी ठेवली, तिच्यावर शेवंतीच्या पाकळ्या होत्या.त्या लाल व पिवळ्या रंगाच्या होत्या { हळदी कुंकवा प्रमाणे } ती पुडी उघडल्यावर त्यातून तशीच दुसरी पुडी निघाली. तिच्यातूनही तशीच आणखी एक पुडी निघाली. अशा प्रकारे पुडीतून पुडी निघतच गेली. माझे स्वप्न संपले परंतु पुड्या निघणे चालूच होते.

ते स्वप्न पडल्यानंतर काही दिवसांतच हा माझा ब्लॉग सुरु झाला व तो आजतागायत सुरूच आहे. हा माझा ब्लॉग म्हणजे श्रीखंड आहे. मी पूर्वी लीलाविग्रही होतो, आता वाङ्मयविग्रही झालो आहे.हे सर्व एकाच कार्याचे दोन प्रकार आहेत.दोन्ही प्रकारांची आपापली वेगळी आवश्यकता असते.परन्तु ते दोन्ही प्रकार परस्पर पुरकच असतात.
*
हरि ॐ तत्सत्
*

माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित

*

DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI

*



इश्वरसे अभिन्नता जीवका मूल धर्म है जो किसीभी तरीकेसे कभीभी बदलता नहीं. जैसे तरंग और समुन्दर कभी जुदा नहीं होते वैसेही जीव अपने परमात्म स्वरूपसे कभीभी जुदा नहीं होता. Being connected to the God is the religion of all, which can never be changed. The God is not separate and not distinct from his creation, just like a wave is not separate or distinct from the ocean.